Home » शिक्षात्मक » शिक्षण » भर लग्नात नवरीने घेतली ‘ही’ परीक्षा, नवरा झाला नापास; अखेर मोडलं लग्न! वाचा सविस्तर प्रकरण…

भर लग्नात नवरीने घेतली ‘ही’ परीक्षा, नवरा झाला नापास; अखेर मोडलं लग्न! वाचा सविस्तर प्रकरण…

Share:

अखेरचे अद्यतनित:

कदमवा गावात लग्न मंडपातच थांबले. वर लवकुश कुमारच्या शिक्षणावर संशय आल्याने नवरीने त्याला नोटा मोजायला सांगितले. वर मोजू शकला नाही, त्यामुळे…

लग्न रद्द केलेलग्न रद्द केले
लग्न रद्द केले

लग्नाचा दिवस हा मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही खूप खास असतो. या दिवसासाठी वधू आणि वर दोघेही खूप तयारी करतात. असंच काहीसं बिहारच्या घोडासहनमधील कदमवा गावात घडलं. जिथे लवकुश कुमार नावाच्या तरुणाची वरात भुरकळ गावात पोहोचली. बँड-बाजा, गाड्या आणि नातेवाईकांसह आलेल्या वरातीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण जयमालेनंतर लगेचच नवरीने असं काही केलं की, घरातील आणि वरातीतील सगळेचजण थक्क झाले. चला, तुम्हाला सविस्तर घेऊया…

फेरे घेण्यापूर्वी नवरीने घेतली नवऱ्याची परीक्षा

प्रमोद पासवान यांचा मुलगा लवकुश कुमार याची वरात बुधवारी मोठ्या थाटामाटात आली होती. संपूर्ण गावात बँडच्या तालावर नाचत-गाजत ही वरात आली. मुलीकडच्यांनीही वरात्यांचं पूर्ण आदराने स्वागत केलं, आणि त्यानंतर हळदीचा विधीही पूर्ण झाला आणि जयमालाही झाली. नवरदेव मंडपात फेरे घेण्यासाठी बसताच, नवरीला नवरदेवाच्या शिक्षणाबद्दल काहीतरी संशय आला. तिला वाटलं की तिच्या भावी नवऱ्याच्या शिक्षणात काहीतरी गडबड आहे. संशयामुळे नवरीने एक अनोखी पद्धत वापरली आणि मंडपातच नवरदेवाची परीक्षा घेण्यास सुरुवात केली.

नवरा बदलला होता, नवरीमुळे बाहेर सत्य

नवरीने नवरदेवाला काही पैसे दिले आणि म्हणाली, ‘जर तुम्ही शिकलेले असाल, तर हे रुपये माझ्यासमोर मोजून दाखवा.’ नवरदेव या साध्या परीक्षेत नापास झाला. त्याला नोटा मोजता आल्या नाहीत. तिथे उपस्थित असलेले सगळेचजण अवाक झाले. नवरीने स्पष्टपणे सांगितलं की, ती निरक्षर व्यक्तीशी लग्न करणार नाही. ती म्हणाली की तिची फसवणूक झाली आहे. तिला सांगितलं गेलं होतं की नवरदेव शिकलेला आहे, पण त्याला काहीही वाचता किंवा मोजता येत नाही. नवरीने तर असंही सांगितलं की, ज्या नवरदेवाशी तिचं लग्न ठरलं होतं, तो हा नाहीये. नवरदेव बदलला असल्याचा तिला संशय होता.

पुन्हा वाद सुरू झाला

नवरीचं बोलणं ऐकल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. मुलीकडच्यांनी नवरदेवाला आणि त्याच्या वरात्यांना ओलीस ठेवलं. परिस्थिती हळूहळू इतकी बिघडली की पोलिसांना बोलवावं लागलं. जेव्हा पाटाही पोलीस स्टेशनचे प्रभारी विनीत कुमार यांना घटनेची माहिती मिळाली, तेव्हा ते तात्काळ आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिथे पोहोचून मध्यस्थी केली आणि नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे सोडवून परत पाठवलं. आता ही घटना सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

मराठी बातम्या/गुन्हा/

भर लग्नात नवरीने घेतली ‘ही’ परीक्षा, नवरा झाला नापास; अखेर मोडलं लग्न! वाचा सविस्तर प्रकरण…

Source link

Leave a Comment